मूल होत नसल्याने सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २२ मार्च २०२२ | बोदवड शहरातील गोरक्षनाथ नगरात विवाहितेने गळफास घेऊन केली आत्महत्या केल्याचे प्रकार घडली आहे. विवाहितेला मूलबाळ होत नसल्याच्या सासरची मंडळी छळ केल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती, चुलत सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

बोदवड शहरातील गोरक्षनाथ नगरात राहणाऱ्या २७ वर्षीय भावना नीलेश महाजन असे मृत महिलेचे नाव आहे. बोदवडच्या गोरक्षनाथनगरमध्ये राहणाऱ्या भावना महाजन व निलेश सुभाष महाजन यांच्या लग्नाला सहा ते सात वर्षे झाली होती. परंतु त्यांना मूलबाळ होत नसल्याने पती व चुलत सासरे व सासू विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करीत तिला क्रूर वागणूक देत होती. जाचाला कंटाळून भावना महाजन यांनी सोमवारी सकाळी ६.३० च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

बोदवड येथे शवविच्छेदनासाठी महिला डॉक्टर नसल्याने मृत विवाहितेवर जळगावी शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह असोदा येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सासरच्या मंडळींनी आत्महत्येला प्रवृत्त केले म्हणून भूषण अशोक माळी ( यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून नीलेश सुभाष महाजन, चुलत सासरे प्रकाश दौलत महाजन व चुलत सासू मंगला प्रकाश महाजन (सर्व रा.गोरक्षनाथनगर, बोदवड) यांच्याविरुद्ध बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून मंगळवारी अटक करण्या आली आहे. पोलिस उपनिरीक्षक शरद माळी तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like