सर्वसामान्य ग्राहकांना बसणार तेलाची फोडणी; खाद्यतेलांच्या दरात २५ रूपयांनी वाढ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २ मार्च २०२२ | रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता आपल्या स्वयंपाकघरातील तेलावर पोहोचणार आहे.येत्या काही दिवसात युद्ध थांबले तरीही परिस्थिती सामान्य होण्यास त्यापुढे दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे, त्यातच देशात पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त होत असल्यानं तेला बरोबरच इतरही वस्तूंच्या दरवाढीला तोंड द्यावे लागणार आहे.दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने खाद्य तेलाच्या आयातीवर परिणाम झाला होता. त्यामुळे सलग दोन वर्षांपासून ग्राहकांना महागाईचे चटके बसत आहेत.

खाद्य तेलाच्या किमती २५ ते ३० रुपयांनी वाढल्यानं सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडू लागला आहे. दरम्यान, जळगावात एकाच दिवसात तेलाच्या पाऊचच्या किंमतीत ८ रुपयाची वाढ झाली आहे. एका आठवडाभरापूर्वी ९०० एमएल तेलाचे पाऊच १३२ रुपयांना बाजारात मिळायचे. त्यात तब्बल २८ रुपयांची वाढ झाली. आठवडाभरातील ही दुसरी वाढ आहे. मंगळवारी ८ रुपयाने तेलाचे पाऊच महागले. १ न २ सरळ २८ रूपयांची वाढ करण्यात आली. गरीबांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

युक्रेनमधून भारताला सूर्यफुलाची आवक हाेते. युद्धामुळे ती बंद झाल्याने ही दरवाढ झाली आहे. जाेपर्यंत युद्धाचे सावट दूर हाेत नाही, ताेपर्यंत तेलाचे भाव चढते राहण्याचा अंदाज आहे. खाद्यतेलात सर्वात महाग शेंगदाणा तेल १६० रुपये किलाे हाेते. त्या खालाेखाल सूर्यफूल तर सर्वात स्वस्त साेयाबीन तेल हाेते; परंतु गेल्या आठवड्यात हे चित्र बदलून साेयाबीन १३२ वरून १६०, सूर्यफूल १४० वरून १५० रुपये तर शेंगदाणा तेल १४० वरून १६० वर पाेहाेचले आहे. सर्वसामान्य माणसाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like