मुलांच्या आत्महत्येचे दुःख सावरताना वडिलांनी देखील सोडले जग

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २ मार्च २०२२ | जळगाव शहरातील कांचननगर परिसरात राहणाऱ्या एका शाळेकरी मुलाने मकरसंक्रांतीच्या दिवशी गळफास घेत आत्महत्या केली होती. आज त्या मुलाचे वडीलांनी कामावर असताना गळफास घेतला. मुलाच्या मृत्यूच्या विरहातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो.

रमेश सुकलाल राजपूत वय ४८ असे मयत इसमाचे नाव आहे. कांचननगरातील रमेश राजपूत हे बुधवारी नेहमीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामावर गेले. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून भरत प्रजापत यांच्या दुकानामध्ये बारदान शिलाईचे काम करत होते. बरे नाही वाटत, मी आत जाऊन झोपतो असे म्हणून रमेश राजपूत हे दुकानाच्या आतमध्ये गेले. काही वेळाने कर्मचाऱ्यांनी तपास केला, त्यांनी आत जाऊन बघितले असता, रमेश राजपूत हे गळफास घेतलेला. तातडीने राजपूत यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

रमेश राजपूत यांचा १३ वर्षीय मुलगा यश याने मकरसंक्रांतीच्या दिवशी गळफास घेतला. या घटनेपासून मयत यशचे वडील रमेश हे तणावात असल्याचे मित्रांनी व कुटुंबीयांनी सांगितले. राजपूत कुटुंबीय त्या घटनेच्या दुःखात आहे तोच दुसरा आघात झाला आहे. आत्‍महत्‍येनंतर घरातील कमावता व कर्ता पुरूष गेला. या घटनेमुळे नातेवाइकांनी रुग्णालयात एकच हंबरडा फोडला. मयत रमेश राजपूत यांच पत्नी आणि दोन मुली परिवार आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like