जळगावात उन्हाचा तडाखा वाढला; तापमानात ३५ अंशाच्या पुढे वाढ होणार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १ मार्च २०२२ |मध्य भारतात निर्माण झालेल्या चक्रावातामुळे तापमानात चढ-उतार हाेत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान वाढत असून, किमान तापमानात तब्बल पाच ते आठ अंश चढ-उतार आहे. अंशतः ढगाळ हवामान आणि उष्ण झळा वाढल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ हाेत असून उन्हाचा चटका बसत आहे. शनिवारनंतर रविवारीदेखील किमान तापमानात माेठे चढ-उतार झाले. जिल्ह्यातील यापूर्वी रविवारी कमाल तापमान ३६ अंशांवर हाेते. तर काल तापमान स्थिर होते. राज्यातील सांगली, सोलापूर, अकोला, परभणी या जिल्ह्यांमध्ये तापमानमात वाढ झाली असून पारा ३५ अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे येथे उन्हाचा तडाखा वाढला आहे.

जिल्ह्यात किमान तापमान १३ ते १५ अंशांदरम्यान स्थिर आहे. किमान तापमान खाली आल्याने पहाटे गारठा कायम आहे. कमाल तापमान ३६ अंश असून उन्हाची तीव्रता वाढली आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील आठवड्यात तापमान चाळिशी पार जाण्याची शक्यता तर पारा ३६ अंशांवर आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण देखील आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like