आत्मनिर्भर युवा केंद्रातर्फे युवकांसाठी शिबीराचे आयोजन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०७ फेब्रुवारी २०२२ |   युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगांवक्ष व विश्वात्मा प्रतिष्ठान चाळीसगांव यांच्या संयुक्त विद्यमाना यांनी चाळीसगांव येथे ‘आत्मनिर्भर भारत’ युवा शिबिराची कार्यशाळा घेण्यात आली.

प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणात सांगताना स्वामी विवेकानंदच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असून अशा युवा शिबिराच्या आयोजन केले आहे. तरुणांनी सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी प्रयन्तशील असावे ज्यातून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात हातभार लागण्यास मदत होईल यावर सूतोवाच केले.

तरुणाईला प्रत्यक्ष विचारांना कृतीची जोड मिळण्यास वाव मिळतो आणि विविध क्षेत्रात प्रभावी भूमिका बजावण्याची प्रेरणा मिळते. तर प्रमुख अतिथी आयकर सहआयुक्त डॉ.उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी आत्मनिर्भर भारतासाठी नेहरु युवा केंद्राचे कार्य हे युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

प्रमुख वक्ते योगेश पाटील यांनी आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक नागरीकाने स्वयंनिर्भर होण्यासाठी योग्य योजना आखणे आणि त्यावर अंमलबजावणी करणे हा ह्यामागचा मुख्य हेतु आहे . डॉ.अभिषेक अग्रवाल यांनी कोरोना जनजागृती संदर्भात सखोल मार्गदर्शन करून तरुणाईच्या मनातील सर्व प्रश्नांची शंका निरसन केले. प्रा.सचिनकुमार दायमा यांनी फिट इंडियाचे महत्व सांगून तरुणाईला खेळ, ट्रेकिंग,योगा,व्यायाम,आहार यावर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय उद्घाटन प्राचार्य बाळासाहेब चव्हाण व प्रमुख अतिथी आयकर सहआयुक्त डॉ.उज्ज्वलकुमार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वात्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड.राहूल वाकलकर, प्रमुख वक्ते डॉ.अभिषेक अग्रवाल, प्रा.योगेश पाटील, प्रा.सचिनकुमार दायमा, रमेशजी पोतदार उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment