बेतूल येथील अपघातात महाराष्ट्रातील ११ कामगारांचा मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ४ नोव्हेंबर २०२२ | मध्य प्रदेशात बेतुल येथे बसने कारला दिलेल्या धडकेत महाराष्ट्रातील ११ कामगारांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली असून सर्व कामगार हे अमरावती जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातानंतर कारचा चक्काचूर झाला आहे. कार बसच्या आतमध्ये घुसली असल्याने इतर मृतदेह काढण्यासाठी तिचा पत्रा कापावा लागला अशी माहिती बेतुल पोलिसांनी दिली आहे.. एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हे कामगार महाराष्ट्रातील अमरावरती येथे निघाले होते. रात्री २ वाजता बसने त्यांच्या एसयुव्हीला धडक दिली. अपघातानंतर सात मृतदेह तात्काळ बाहेर काढण्यात आले. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like