रागातून गुराख्यांनी मध्यरात्री कापले , शेतकरीचे २५०० केळीचे घड

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १५ मार्च २०२२  |जळगावात ता. रावेर येथे चिनावल शिवारात शेतातील उभे पीक कापून फेकण्याच्या घटनेचे अनेक प्रकार आता यावल तालुक्यात पसरू लागले आहे. शेतात शेळ्या चारणाऱ्या सहा गुराख्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

किशोर राणे यांनी दिलेल्या फिर्यादित सांगितले, त्यांनी दिनकर पुंडलिक वारके यांचे सोमवार रस्त्यावरील शेत बटाईने केले आहे. रागातून सहा संशयितांनी शेतातील टिश्यूकल्चर जातीचे २५०० केळीचे घड मध्यरात्री कापून फेकल्याची घटना यावल तालुक्यातील अट्रावल येथे घडलीय. यामुळे येथील प्रगतशील शेतकरी किशोर देवराम राणे यांचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले.तेथे त्यांनी ३५०० खोड केळी लागवड केली आहे.

रा.यावल तालुका राणे यांनी अट्रावल रस्त्यावर बटाईने केलेल्या शेतात शनिवारी मार्च.१२ सहा गुराखी हरभरा पिकात जबरदस्तीने शेळ्या चारत होते. त्यांना हटकल्याने संशयितांनी राणे यांना मारहाण केली होती. यामुळे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला. याचा राग येऊन संशयित राजेंद्र काशीनाथ जाधव, विनोद गोविंदा खैरे, स्वप्नील उर्फ भुरा छगन धनगर, एकनाथ तोताराम भील, अनिल गंगाधर धनगर यांनी किशोर राणे यांना केळी कापून फेकण्याची धमकी दिली होती.

दिलेली धमकी ती संशयितांनी एका रात्रीतून खरी केली. राणे यांच्या तक्रारीवरुन राजेंद्र काशीनाथ जाधव, विनोद गोविंदा खैरे, स्वप्नील उर्फ भुरा छगन धनगर, एकनाथ तोताराम भील, अनिल गंगाधर धनगर (सर्व रा.यावल) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like