कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुणाने घेतला गळफास

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ मार्च २०२२ | जळगावात शहरात आहुजानगरातील कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुणाने राहत्या घरात चिठ्ठी लिहून गळफास घेतल्याची घटना घडली. तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अविनाश उर्फ बाळू बोरसे (वय ३९, रा. सुकृती अपार्टमेंट, आहुजानगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. अविनाश ऊर्फ बाळू अरूण बोरसे हा पत्नी व मुलांसह आहुजानगरातील संस्कृती अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे .शनिवारी (ता. १२) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घरात चिठ्ठी लिहून गळफास घेतल्याची घटना घडली. काही दिवसांपासून अविनाश बोरसे यांची पत्नी बाहेरगावी गेली होती. अविनाश घरी एकटाच होता. अविनाशची आईला फोन लावण्याचा भरपूर प्रयत्‍न केला. परंतु फोन लागला नाही. नंतर त्यांनी भाचा प्रशांत पाटील यांना याची माहिती दिली.

चौकशी करता प्रशांत पाटील घरी गेला असता अविनाशचा घराचा दरवाजा आतून बंद केला होता. त्याने बाल्कनीमधून डोकावून पाहिले असता अविनाशने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले. अविनाशने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात ‘मी कर्जबाजारी असल्याने स्वत:च्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहे’ असे नमूद केल्याचे आढळून आले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment